मुंबई : मुंबईतल्या भायखळा मतदार संघात एमआयएमच्या गडाला सुरुंग लावण्यात शिवसेना सध्यातरी आघाडीवर दिसत आहे. शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी मोठी आघाडी घेतली आहे. एमआयएमचे विद्ममान आमदार वारिस पठाण यांचा पराभव होण्याची शक्यता आहे.
भायखळा हा २००९ सालापासून काँग्रेसचा मतदारसंघ आहेत. मात्र, २०१४ साली काँग्रेसचे उमेदवार मधु चव्हाण यांचा पराभव करुन वारिस पठाण यांनी निवडणुकीत बाजी मारली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने यामिनी जाधव यांना उमेदवारी देत या मतदारसंघात मोठं आव्हान निर्माण केलं होतं. काँग्रेसचे मधु चव्हाण आणि अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांनीही भायखळा मतदारसंघात आव्हान उभं केलं होतं. मात्र मतमोजणीत या सर्व उमेदवारांना मतदारांनी साफ नाकारल्याचं समोर येतं आहे. ज्यामुळे अखेरच्या फेरीपर्यंत हाच कल कायम राहिल्यास एमआयएमचा गड शिवसेना काबिज करेल अशी परिस्थिती आहे.