मुंबई : दर रविवारी दुरूस्ती आणि देखभालीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येतो. परंतु, दिवाळीनिमित्त रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे सणासुदीचा प्रवाशांचा दिलासा मिळाला आहे.
दर रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक घेतला जात होता. मात्र, सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडतात. त्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला. यामुळे प्रवाशांची अडचण होणार नाही याची जवाबदारी रेल्वे प्रशासनाने घेतली आहे.