फ्रान्सने पहिल राफेल विमान भारताच्या स्वाधीन केले. हे विमान भारतात आणण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह फ्रान्सला गेले होते. त्यांनी राफेल विमानाची पूजा केली आणि सोबत विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवले. त्यांच्या याच कृतीमुळे नेटीझन्सनी राजनाथ सिंह यांच्यावर टीका केली आहे. आता या लिंबू प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील राजनाथ सिंह यांच्यावर टीका केली आहे.
राफेल विमानाखाली जसे राजनाथ सिंह यांनी लिंबू ठेवले तसेच पीएमसी बँकेच्या ग्राहकांनी पीएमसी बँकेच्या प्रत्येक शाखेबाहेर लिंबू लावावा, अशी मिश्किल टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. दोन लिंबू ठेवून राफेल सुरक्षित होऊ शकतो, तर तुमचे पैसे का होणार नाहीत ? असा मिश्किल सवाल त्यांनी ट्विटरवर उपस्थित केला.
#PMCBank च्या ग्राहकांनी 2-2 लिंबू बँकेच्या प्रत्येक शाखेच्या मुख्य दरवाज्याला लावुन ठेवावा.. 2 लिंबू ठेवून राफेल सुरक्षित होऊ शकते तर तुमचे पैशे का नाही? 😂😂😂 pic.twitter.com/x98Uc3iXRa
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 9, 2019