Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रनाशिककृषीमंत्री म्हणाले, कांदा खाल्ला नाही म्हणून मरत नाही

कृषीमंत्री म्हणाले, कांदा खाल्ला नाही म्हणून मरत नाही

नाशिक : कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही. कांदा खायचा असेल तर 50-60 रुपये किलो दराने घेऊन खा. विनाकारणची ओरड थांबवा, असं अजब सल्ला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला.

कांद्या दरावरुन ओरड करणाऱ्यांना जास्त दराने कांदा खाणं शक्य नसेल तर शेती घेऊन कांदा पिकवण्याचा सल्लाही दिला. ते परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी निफाड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी हा सल्ला दिला.

परतीच्या पावसाने यंदा कांद्याला मोठे नुकसान होणार आहे. परिणामी कांद्याचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत कांदा 50-60 रुपये किलो दराने खावा लागला, तर खुशाल खाल्ला पाहिजे. कांदा हा काही अणुबॉम्ब नाही. शेतकरी 3-4 महिन्यात लागेल तितका कांदा पिकवू शकतो. विनाकारण कांद्याची ओरड थांबवावी, अन्यथा ओरडणाऱ्यांनी शेती घ्यावी आणि ती करावी, असा सल्लाही खोत यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments