Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रआम्ही एकमेकांशिवाय सुखी राहिलो नसतो सांगत प्रेमीयुगुलांची आत्महत्या

आम्ही एकमेकांशिवाय सुखी राहिलो नसतो सांगत प्रेमीयुगुलांची आत्महत्या

love couple, suicideमहत्वाचे…
१. रविवार सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली
२. अविनाश हा सांगलीतील एका सहकारी बँकेचा कर्मचारी होता
३. आत्महत्येस कोणास जबाबदार धरू नये, असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले


सांगली:  येथील प्रेमी युगुलाने महाबळेश्वर येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. महाबळेश्वर येथील केट्स पाँईंटवर या युगुलाने गळफास घेतला होता. ही घटना आज (दि.१५ एप्रिल) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. अविनाश आनंदा जाधव (वय २८) आणि तेजश्री रमेश नलावडे (दोघेही रा. धुतोंडी, ता. पलूस, जि. सांगली) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलांचे नाव आहे.

या प्रेमी युगुलाजवळ सुसाईड नोट आढळून आली असून आमच्या आत्महत्येस कोणास जबाबदार धरू नये, असे त्यांनी त्यामध्ये लिहिले आहे. पाचगणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश जाधव आणि तेजश्री नलावडे हे शनिवारी महाबळेश्वर येथे आले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी गळफास घेतला. सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अविनाश हा सांगलीतील मानसिंग सहकारी बँकेचा कर्मचारी होता.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय

आम्ही एकमेकांशिवाय सुखी राहिलो नसतो. आम्ही दोघेही एकमेकांशिवाय जगू शकत नव्हतो. आत्महत्येशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आमच्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये. दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी आता वाद करू नयेत. भांडणे केल्यास आमच्या आत्म्यास शांती मिळणार नाही, असे या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments