“हार हो जाती है जब मान लिया जाता है !
जीत तब होती है जब ठान लिया जाता है !”
असं नविन ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अँजिओप्लास्टी नंतर रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर केलं. विशेष म्हणजे टि्वट मधून त्यांनी सरकार स्थापनेचा निर्धार केला आहे.
सत्तास्थापनेच्या वादानंतर शिवसेना आता खूप पुढं निघून आली आहे, हेच राऊत यांनी आपल्या नव्या ट्विटमधून सुचवलं आहे. ‘माणूस तेव्हाच हरतो, जेव्हा आपण हरलो आहे असं तो मानतो आणि विजय तेव्हाच होतो, जेव्हा मनाचा निर्धार पक्का असतो. शिवसेनेनं विजयाचा निर्धार केला आहे. आता आम्ही हरणार नाही. आता भीती आणि माघारीची शक्यता नाही,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
अब हारना और डरना मना है.. pic.twitter.com/mMCZyQmr84
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 14, 2019
सत्तास्थापनेच्या उठलेल्या वादानंतर राऊत हे केंद्रस्थानी आहेत. ठरल्याप्रमाणे सत्तावाटप होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राऊत हे रोज पत्रकार परिषदा घेऊन भाजपवर हल्लाबोल करत आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण गेले काही दिवस चांगलेच तापले होते. तसेच टि्वटरवरून राऊत हे भाजपचा दररोज समाचार घेत आहेत. त्यामुळे राऊत काय बोलतात. काय टि्वट करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं असतं.