Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपनं पराभवाचा राग ‘गव्या’वर काढला का? शिवसेनेनं भाजपला डिवचले

भाजपनं पराभवाचा राग ‘गव्या’वर काढला का? शिवसेनेनं भाजपला डिवचले

मुंबई : पुण्यात जंगलाची वाट चुकून मानवी वस्तीत शिरलेल्या रानगव्याचा मृत्यू झाला होता. यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत काही मानवी गव्यांना लोकांनी वेसण घातली. त्याचा राग रानगव्यास मारून कोणी काढला काय? अशी अप्रत्यक्ष टीका सामनामधून करण्यात आली आहे.

“माणूस हा दंगली जमावापेक्षा जास्त हिंसक झाला आहे. एकाबाजूला आपण पर्यावरण, डोंगरांचे रक्षण करतो. नद्यांसाठी मोठे प्रोजेक्ट आणतो. वाघ बचाव, सिंह बचाव यात रान गव्यासाठी प्राणी येत नाहीत का? एक रानगवा चुकून पुणे शहरात आला असेल, पण त्याला अशाप्रकारे क्रूरपणे मारणं हे माणुसकीच्या कोणत्या धर्मात बसतं? ज्यापद्धतीने लोकं त्याच्या मागे लागले होते. ते अत्यंत संतापजनक होतं.

“रानगवा हा इतका शक्तीमान प्राणी असूनही हृदयविकाराचा झटक्याने मरण पावला. कुठेतरी जंगल खात्यातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. का फक्त वाघाला साखळी लावून पकडणं, इथपर्यंत जंगल खात्याचे काम नाही. असे असंख्य प्राणी आहेत.  आपण जंगलावर अतिक्रमण केल्यामुळे ते आपल्या भागात येत आहेत. आपण जंगलात शिरलो आहे, फार्महाऊस बांधतो, गाड्या घेऊन फिरतो. त्यातील पाणी चारा संपतो आहे. आपण त्यांना वाचवलं पाहिजे,” असेही राऊतांनी म्हटले.

“शिक्षक पदवीधर मतदारसंघात काही रानगव्यांनी पुणेकरांनी वेसण घातली आहे. नागपूरलाही घातली. त्यामुळे हिंसा वाढली असावी,” असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

एका गव्यास पुणेकरांनी मारून दाखवले. पुणेकरांनी हेसुद्धा करून दाखवलं. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात हे घडले. भाजपवाले आता असा आरोप करतील की, हे नक्कीच महाविकास आघाडीचे अपयश आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणतील, गव्यास मारले ते पाकिस्तान-चीनच्या चिथावणीमुळेच! पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत काही मानवी गव्यांना लोकांनी वेसण घातली. त्याचा राग रानगव्यास मारून कोणी काढला काय? पुणे तिथे काय उणे!, असे संजय राऊतांनी अग्रलेखात म्हटलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments