पाटणा – भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी गुजरात निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी वादग्रस्त विधान केले आहे. अभिनेते सिन्हा निवडणुकीतील विजयाचे श्रेय तर मिळेल मात्र, पराभवाची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
…If we are victorious, we know you shall get full credit..but if we are not, then who will take the rap? There’s an old saying – “Taali kaptaan ko to gaali bhi kaptaan ko”. Hope wish and pray that we get only Taalis in Gujarat elections. Jai Hind!
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) December 13, 2017
चित्रपट अभिनेते आणि भाजपचे खासदार असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून मोदींवर निशाणा साधला आहे. जिंकण्याचे श्रेय जसे मिळते तसे हारण्याचे ही श्रेय स्वीकारावे असे ट्विट केले. त्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी ते रिट्वीट केले होते.
सिन्हा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये एका जुन्या म्हणीचा संदर्भ देत “टाळ्या जर नेतृत्व करणाऱ्याला मिळत असतील तर टीकांचाही त्यानेच स्वीकार करायला हवा, अशा आशयाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. त्याच बरोबर त्या विधानाचा समतोल राखण्यासाठी गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला टाळ्याच मिळतील असेही सिन्हा यांनी म्हटले आहे.