मुंबई: टेलिव्हिजन अभिनेता करण परांजपे याचे रविवारी निधन झाले. तो २६ वर्षांचा होता. करणच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मुंबईतील राहत्या घरी त्याचा मृतदेह आढळला असून हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याचे म्हटले जात आहे.
रविवारी सकाळी ११च्या सुमारास करणच्या आईला त्याचा मृतदेह आढळला. ‘दिल मिल गए’ या मालिकेतून करण प्रसिद्धीच्या झोतात आला होता. या मालिकेत त्याने ‘जिग्नेश’ची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
करणच्या अकस्मात निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली असून अनेकांकडून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. ‘दिल मिल गए’ मालिकेतील सहकलाकार करण वाही याने इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून करणला श्रद्धांजली वाहिली.