दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील झाशी रोडवर रविवारी सकाळी अनाज मंडीमध्ये पहाटे पाचच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. यामुळे दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे.
अनाज मंडीमध्ये कारखान्याला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की आगीवर निंयत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळावर तब्बल 30 अग्निशामक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आलं आहे. आगीने रौद्र रुप धारण केलं आहे. यामध्ये 50 हून अधिक लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे तर 43 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला.