भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सरकार स्थापनेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही,” असं भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुंनगंटीवार यांनी सांगितले. भाजपाचं सरकार कसं आणायचं याची तयारी आम्ही सुरु केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी माझ्या खांद्यांवर टाकली आहे असा दावा राणे यांनी केला होता. तो दावा भाजपकडूनच फेटाळण्यात आला.
कालच मुंबईत राजकीय घडामोडी घडल्या विशेष म्हणजे मंगळवारी संध्याकाळी द रिट्रिट हॉटेलमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबतच जाणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर भाजपाचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाचं सरकार कसं आणायचं याची तयारी आम्ही सुरु केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी माझ्या खांद्यांवर टाकली आहे असा दावा केला होता.
दरम्यान, त्यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार स्थापनेचा नारायण राणेंचा दावा फेटाळला आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत असा कोणताही निर्णय झालेला नाही, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राणे यांनी केलेला दावा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न होता अशी चर्चा होत आहे.