Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजनयोगी आदित्यनाथ यांना गौहर खानने ‘हा’ केला सवाल

योगी आदित्यनाथ यांना गौहर खानने ‘हा’ केला सवाल

Gauhar Khan,Gauhar, Khanमुंबई : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरु आहेत.  उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील काही मुस्लिम बांधवांनी तब्बल सहा लाख रुपयांचा चेक तेथील जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्त केला. यावरुन बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान हिने उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. “झालेल्या नुकसानाची भरपाई घेतली, परंतु हिंसाचारात प्राण गमावल्यांचे काय?” अशा आशयाचे ट्विट तिने केले आहे.

देशभरात काही ठिकाणी समर्थनार्थ तर काही ठिकाणी विरोधात निदर्शने करण्यात आले आहेत. आंदोलनादरम्यान हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत. यामुळे केंद्र सरकारवर बरीच टिकाही झाल्या आहेत.


गौहर खानने ट्विट्मध्ये काय विचारला प्रश्न…

“सार्वजनिक नुकसानाची भरपाई तर सरकारने वसुल करुन घेतली. परंतु हिंसाचारात झालेल्या वैयक्तिक नुकसानाचे काय? त्यांचे काय ज्यांनी आपला जीव गमावला, त्यांचे काय ज्यांचा पैपै साठवून उभारलेला संसार मोडिस निघाला.” अशा आशयाचे ट्विट गौहर खान हिने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments