मुंबई: पत्नी पाच दिवसांपूर्वी घर सोडून गेली होती. भांडण झाल्यानंतर अनेकदा पत्नी घर सोडून जात असे. या कारणामुळे चेंबूरमध्ये ३५ वर्षाच्या व्यक्तीने आपल्या दोन मुलांची हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लंबर म्हणून काम करणारा दिनेश यादव याने आपल्या तीन महिन्याच्या मुलीची आणि १८ महिन्यांच्या मुलाची हत्या केली आणि नंतर गळफास घेतलं आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
मुलांची गळा दाबून हत्या करण्यात आली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. प्राथमिक तपासात पत्नी वारंवार घर सोडून जात असल्याने दिनेश यादव मानसिकरित्या त्रस्त होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दिनेश यादव याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करणार आहे. रात्री ११ ते सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हत्या झाली असून त्यावेळी दरवाजा आतून बंद करण्यात आला होता.
दिवसांपूर्वी घर सोडून गेली…..
भांडण झाल्याने यादव यांची पत्नी पाच दिवसांपूर्वी घर सोडून गेली होती. भांडण झाल्यानंतर अनेकदा पत्नी घर सोडून जात असे. रविवारी घराचा दरवाजा आतून बंद होता. शेजारी राहणाऱ्या भावाने सकाळी कोणीही उत्तर देत नसल्याने शेजाऱ्यांना गोळा करुन दरवाजा तोडला”.
यावेळी मुलं बेडवर मृतावस्थेत पडलेली होती. तर दिनेश यादव यांनी दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेतल्याचं लक्षात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
वडिलांनी गळा दाबून मुलांची हत्या केल्यानंतर आत्महत्या केली असावी असा आम्हाला संशय आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमकं कारण समजू शकेल. हत्या असल्यास दिनेश यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करु. पुढील तपास पोलीस करत आहेत.