इंदौर : नशेमध्ये असणं चांगली गोष्ट आहे. मात्र देशभक्तीचा नशा इतकाही करू नये की पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखं लग्नचं केलं नाही. असं वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव आणि मध्य प्रदेशचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी केलं आहे. त्यामुळे विजयवर्गीयांच्या विधानाची जोरदार चर्चा सुरु आहे.
मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये नशाविरोधात मॅरेथ़ॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजप नेते विजयवर्गीय यांनी तरुणांना मार्गदर्शन केलं. पुढे बोलताना त्यांनी तरुणांना नशा न करण्याचा सल्ला दिला. पुढे म्हणाले की, नशेमध्ये असणं चांगली गोष्ट आहे. मात्र ही नशा काम आणि देशभक्तीची असावी. यापुढे जाऊन ते म्हणाले की इतकीही नशा करू नका की मोदींसारख लग्नच करणार नाही.
काही दिवसांपूर्वी कैलाश विजयवर्गीय यांनी इंदौरचे प्रसिद्ध पोह्यांबाबत वक्तव्य केलं होतं. त्य़ांच्या या वक्तव्यानंतर मात्र विरोधकांनी त्यांना निशाण्यावर धरले होते. पोह्यांबाबत ते म्हणाले होते की माझ्या घर मजुरी करणाऱ्या लोकांच्या पोहे खाण्याच्या पद्धतीवरुन माझ्या लक्षात आले की ते बांगलादेशी आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर समाज माध्यमांतून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.