नवी दिल्ली : पुरुष टी-20 वर्ल्ड कपसाठी बराच काळ शिल्लक आहे. मात्र, त्याआधी २१ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान ऑस्ट्रेलियात महिला टी -२० वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. दरम्यान, या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. या स्पर्धेसाठी आज रविवार (१२ जानेवारी) बीसीसीआयच्या वतीनं टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
वर्ल्ड कप संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे देण्यात आले आहे. तर, स्मृती मांधनाला उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी युवा फलंदाज शेफाली वर्मावरही निवड समितीने दाखवला आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा पहिलाच सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे होणार आहे.
📢Squad Announcement📢@ImHarmanpreet will lead India’s charge at @T20WorldCup #T20WorldCup #TeamIndia pic.twitter.com/QkpyypyJKc
— BCCI Women (@BCCIWomen) January 12, 2020
भारतीय संघ २०२० मध्ये तब्बल तीन वर्ल्ड कप खेळणार आहे. यात एक अंडर-१९ वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. विश्वचषक व्यतिरिक्त महिला आणि पुरुष टी – २० वर्ल्ड कपदेखील होणार आहेत.