मुंबई : मनसे नावाची पार्टी राहिलीच नाही कुठे आहे? ही तुमच्याकडे दिसते तरी थोडी, आमच्याकडे तर लोणच्यालाही नाही. ज्यांनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला आहे. अशी घणाघाती टीका पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
मनसे झेंड्याचा रंग बदलणार असल्याची चर्चा सुरु आहे. मनसे मोठं अधिवेशन घेणार असल्यामुळे पुन्हा मनसेची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, मनसेची मोठ्या प्रमाणात वाताहात झाल्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका होता आहे. नामदार गुलाबराव पाटील म्हणाले, ज्यांनी बाळासाहेबांना धोका दिला त्यांचा सत्यानाश झाला. राज ठाकरेंचे आडनाव ठाकरे नसते, तर ते संगीतकार म्हणून दिसले असते, अशी टीका नामदार गुलाबराव पाटील यांनी केली.
नाशिकमध्ये मनपाच्या प्रभाग क्रमांक २६ च्या पोटनिवडणुकीसाठी प्रचार सुरु आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नामदार गुलाबराव पाटील आले होते. त्यावेळी त्यांना जोरदार टीका केली. विशेष म्हणजे यावेळी भाजपवरही जोरदार हल्लाबोल करण्यात आला.