आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनेक महत्वाचे निर्णय घेत असतो. मग ते कधी बरोबर असतात तर कधी चुकीचे. म्हणूनच काहीही करण्याआधी ‘या‘ गोष्टीचा विचार करणं खूप महत्वाचं आहे.
कोणतही काम करण्याआधी त्याच्या परिणामांचा विचार करा. आपण जे पण काही काम करणार आहोत त्याचं योग्य आणि सकारात्मक आकलन करा. त्याचा तुम्हाला पूढे खूप फायदा होईल.
कठीण कामाला छोट्या छोट्या भागांमध्ये विभागा. आणि मग एका एका भागाचा अभ्यास काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक पूर्ण करा.
एकावेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करा. कोणतं काम महत्वाचं आहे हे ठरवा आणि त्याला सगळ्यात आधी पूर्ण करा.
आपल्या आरामदायी राहणीमानीतून बाहेर या आणि आव्हानांना तोंड द्या. त्याने आयुष्याला वेग येईल.
आणि गोष्ट करायची म्हटलं की त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी आपल्याला ठेवायला हवीच.